मुंबईकरांची सहिष्णुता, डोंबिवलीकरांची सहनशीलता असे बाष्कळ गुणधर्म अंगी बिंबवल्यावर पुण्यात येऊन सन्मान, निष्ठा, गर्व असे गुण शिकणं कठीण गेलं. तिशी सरली, दादाचा काका झालो, नशिबाने शेकडो लोकांच्या संपर्कात आलो आणि मेंदूच्या ग्रंथालायातले सर्व रकाने अनुभवांच्या पुस्तकाने अक्षरशः अगदी गच्च भरले. कधी असंच काही कागदावर उतरतं आणि मग ते कुणाला तरी दाखवावसे वाटते. बरं वाईट, गोड तिखट, कडू आंबट जे काय मनात येईल (आणि अर्थात जे काय प्रदर्शनीय असेल) ते प्रामाणिकपणे लिहिण्याचा माझा प्रयज्ञ असेल.
मंगळवार, १७ मे, २०११
माया जमावीशी काहे, भोगी फुकाच्या ह्या कळा
रिक्त हाताने संपतो, जीवनाचा हा सोहळा